ओल्या सांजवेळी,
उन्हे सावलीस बिलगावी
तशी तू जवळी ये जरा
कोऱ्या कागदाची,
कविता अन जशी व्हावी
तशी तू हलके बोल ना
आभाळ खाली झुके,
पावलांखाली धुके
सुख हे नवे सलगी करे,
का सांग ना सारे जुने दुवे,
जळती जसे दिवे पाण्यावरी
जरा सोडून देऊया माझी ही आर्जवे,
पसरून काजवे जातील या नव्या वाटेवरी
तुझ्या रस्ता नवा शोधू जरा,
हातात हात दे पुसुया जुन्या पाउल खुणा सोबत
तुझी साथ दे वळणावरी तुझ्या पाऊस मी उभा
ओंजळ तुझी पुन्हा वाहून जाऊ दे डोळ्यातल्या सरी
विसरून ये घरी ओळख आता खरी होऊन जाऊ दे
सांभाळ तू माझे मला माझ्या नव्या फुला मी सावली होऊन तुझी देईन साथ ही तुला
प्रेमात पडणं सोप्पं असतं
पण शेवटपर्यंत टिकवणं खूप अवघड असतं....
प्रेमात वचनं देणं सोप्पं असतं
पण ती निभावनं कठीण असतं....
प्रेमात दिवस–रात्र एकमेकांशी बोलणं सोप्पंअसतं
पण विरह सहन करणं अशक्य असतं....
प्रेम करणं सोप्पं असतं
पण प्रेम विसरणं शक्य नसतं....
प्रेमात जगण्यासाठी वचनं द्यायची असतात
पण शपथा देवून जीवाला बरं वाईट करून घेवू नकोस
असं म्हणायची वेळ येवून द्यायची नसते....
प्रेम जगण्यासाठी करायचं असतं
आणि प्रेमातच जगायचं असतं....
प्रेमासाठी मरून प्रेमाचा अपमान करायचा नसतो....
प्रेम प्रेम असतं
दोन हृदयानचं अतूट नातं असतं....
एकमेकांना समजून घ्यायचं असतं
आणि एकमेकांबरोबरच जगायचं असतं....
प्रेम प्रेम असतं
प्रेमाचं विश्वच वेगळ असतं
आणि त्या विश्वात एकदातरी जगायचं असतं
पण प्रेम मात्र शेवटपर्यंत जपायचं असतं....!!
जुनेच मॅसेज पुन्हा पुन्हा वाचत असत
कोणीतरी..
पावसाच्या थेंबात अश्रु लपवुन रडत असत
कोणीतरी..
कोणालातरी हसतांना लपुन बघत असत
कोणीतरी..
दिवे सगळे विझल्यावर का जळत असत
कोणीतरी..
सगळ जग झोपेत
असतांना उघड्या डोळ्यांनी स्वप्न बघत
असत कोणीतरी..
कुणी येणार नाही तरी वाट बघत असत
कोणीतरी..
माणसांच्या या इतक्या गर्दीत का एकट असत
कोणीतरी.
"किती छान जाणीव असते
आपण कोणाचे तरी असणे
या पेक्षा भयंकर काहीच नाही
जगात आपलच कोणी नसणे"
माझ्यासोबत जगण्याचा
सोड तु वेडा अट्टहास
मंगळसुत्र तर दूरची गोष्ट
गळ्यात पडेल काट्यांचा फ़ास
बंधनांच कुंपण ओलांडून तु ये
हव तर घरच्यांशी भांडून तु ये
खूप जगलीस दुसर्यांच्या मर्जीप्रमाणे
गुलामीच आयुष्य कोंडून तु ये
स्वप्नांची राखरांगोळी करायच
माझ मीच ठरवल आहे
तुझ्या आठवणींनाही जागा नसेल
अस नव स्वप्न मी बनवल आह
प्रेमात किती बुडाले किती तरंगले
याची काही गिणतीच नाही
प्रेमभंगाच्या दुःखासारखी
वाईट गोष्ट कोणतीच नाही
"का कुणी दवाला मोत्यांचे नाव दिले
एवढ्या छान गुलाबाला काट्यांचे घाव दिले
कश्या सुचल्या असतील कुणाला ह्या उपमा
हृदयाला झालेल्या पाहील्यात
का तुम्ही जखमा"
तुझ्या शब्दांची वाट पाहण्यातच
कितीतरी कविता लिहून झाल्यात
कागदावर उतरलेल्या सार्या कविता
तुझ्या आठवणींना पिऊन आल्यात