मैत्री केली आहेस म्हणुन तुला सांगावस वाटतय...
गरज म्हणून नातं कधी जोडू नकोस
सोय म्हणून सहज असं तोडू नकोस..
रक्ताचं नाही म्हणून, कवडीमोल ठरवू नकोस
भावनांचं मोल जाण..मोठेपणात हरवू नकोस..
आयुष्याच्या प्रत्येक वळणात नवं नातं जुळत असतं
जन्मभर पुरेल इतकं भरून प्रेम मिळत असतं..
तुझी ओंजळ पुढे कर, कमीपणा मानू नकोस
व्यवहारातलं देणं घेणं फक्तं मध्ये आणू नकोस..
मिळेल तितकं घेत रहा, जमेल तितकं देत रहा
दिलं घेतलं सरेल तेव्हा.. पुन्हा मागून घेत रहा..
समाधानात तडजोड असते...फक्त जरा समजून घे
नातं म्हणजे ओझं नाही, मनापासून उमजून घे..
विश्वासाचे चार शब्दं..दुसरं काही देऊ नकोस
जाणीवपूर्वक नातं जप , मध्येच माघार घेऊ नकोस...!
...मैत्री...
स्नेहाचं बंधन
आपूलकीचं कोंदण
सहवासची आस
जीवनाचा श्वास ...हिच तर मैत्री खास...!!
रमणीय नातं
जीवनगाणे गातं
आयुष्याचं चित्र
रंगवतात मित्र...हेच तर जीवनाचं सूत्र...!!
सुखदु:खाची झळ
आयुष्यासाठी बळ
हक्काची जाण
जिथे दोघांणा मान...हिच तर मैत्री छान...!!
नको तो रुसवा
नको तो दुरावा
जमू दे गप्पांचा थाट
असुदे विचारांचा घात...हिच तर मैत्रीची वाट...!!
आरे ती असेल गुलाबाची पाखळी
पन आपले मित्र आपल्यासाठी
सोन्याची साखळी....
खास मिञांसाठी
खरे मित्र असे असतात त्यांना दोन दिवस शिव्या दिल्या नाहीतर विचारतात
काय भाऊ नाराज आहेस का माझ्यावर
Aapli maitri ek phool aahe,
Jyala mi todu shakat nahi,
Aani soduhi shakat nahi,
Kaaran,todle tar sukun jail,
Aani sodle tar koni dusra gheun jail
तेज असावे सूर्यासारखे,
प्रखरता असावी चंद्रासारखी,
शीतलता असावी चांदण्यासारखी,
आणि मैत्री असावी तुझ्यासारखी…
आपल्यासाठी तोच मिञ
खास असतो...
ज्याबद्दल घरचे म्हणतात-
याच्या सोबत परत दिसला
तर तंगड तोडीन..
तुटलेल्या काचा कितीही चिटकवण्याच प्रयत्न केला तरी त्यात तडा राहतोच.
तशीच नाती असतात, एकदा तुटली की, पुन्हा जोड़ताना तडा तसाच राहतो.
म्हणून जोडलेली नाती आणि ठेवलेला विश्वास नेहमी जपावा.
शेवटी तुटलेल्या गोष्टी गोळा करताना जखमा होतातच.
Miscall देऊन वैताग आणणारी ,
नेहमी Blank Message पाठवणारी,
.
हक्काने जीच्यावर राग व्यक्त
करता येईल ,
वेळ घालवायचा म्हणून फोन करून डोक Out करणारी ,
... .
मूड ऑफ झाल्यावर फालतू विनोद सांगून,
पोट दुखेपर्यंत हसवणारी ,
.
आपण न सांगताच,
आपल्या मनातलं ओळखणारी ,
.
कोणाच्याही समोर थट्टा केल्यावर,
न चिडणारी ,
.
थोडीशी Short - Tempered ,
अशीही एखादी मैत्रीण असावी
"पराभव पहिल्यांदा रणात होत नाही पराभव पहिल्यांदा मनात होतो,
जी माणसे मनाने पराभूत असतात ती रणात जिंकूच शकत नाहीत.
आणि जी माणसे मनाने जिंकलेलीच असतात ती रणात पराभूत होवूच शकत नाही.
पहिल्यांदा मन जिंकणे जास्त गरजेचे, रण मग आपोआप जिंकले जाते.....